🕒 1 min read
जालना: शेतकऱ्यांना थकीत वीजबिल बाकीसाठी कोणतीही पूर्वसूचना व लेखी नोटीस न देता महावितरणचे अधिकारी कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करतात? असा जाब विचारत माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांनी अधिकाऱ्यांना नियमाचे उल्लंघन केल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला दिला.
पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले तर याद राखा असा इशारा बबनराव लोणीकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तुम्हाला शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही का? असा सवाल उपस्थित करीत लोणीकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून वसुली करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले तर याद राखा !@Dev_Fadnavis @ChDadaPatil @SMungantiwar @SKoudge @DoctorAnilBonde @BJP4Maharashtra @Madhavbhandari_ @Sadabhau_khot pic.twitter.com/QC9CJKD9gw
— Babanrao Lonikar (@BabanraoLonikar) December 11, 2021
दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तगादा न लावता सवलत द्या अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच महावितरणने वीजतोडणी मोहीम बंद न केल्यास अधीक्षक अभियंता कार्यालयावर आंदोलनाचा इशारा बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू- नवाब मलिक
- ‘मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे’
- भाजपने ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची केली मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
