Share

पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले तर याद राखा; भाजपचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

जालना: शेतकऱ्यांना थकीत वीजबिल बाकीसाठी कोणतीही पूर्वसूचना व लेखी नोटीस न देता महावितरणचे अधिकारी कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करतात? असा जाब विचारत माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांनी अधिकाऱ्यांना नियमाचे उल्लंघन केल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला दिला.

पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले तर याद राखा असा इशारा बबनराव लोणीकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तुम्हाला शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही का? असा सवाल उपस्थित करीत लोणीकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून वसुली करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तगादा न लावता सवलत द्या अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच महावितरणने वीजतोडणी मोहीम बंद न केल्यास अधीक्षक अभियंता कार्यालयावर आंदोलनाचा इशारा बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!