Share

औरंगाबादेतील शाळा सुरु होणार नाही; मनपाकडून पुन्हा एकदा निर्णय लांबणीवर!

Published On: 

औरंगाबादः कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अजूनही औरंगाबाद शहरातील शाळा पूर्ववत सुरू झालेल्या नाहीत. महानगरपालिका आयुक्त अास्तिक कुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत आज निर्णय होणार होता. मात्र आता हा निर्णय आणखी ५ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. १५ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल.

महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी याबाबत माहिती दिली. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत शहरातील शाळा सुरु होण्यासंबंधी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती टेंगळे यांनी दिली. पुणे-पिंपरी चिंचवड आणि नाशिक महापालिकेचा निर्णय लांबणीवर पडल्यानंतर औरंगाबाद मनपाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आली आहे.

ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर १० डिसेंबरला शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असे आस्तिक कुमार पांडेय म्हणाले होते. आता औरंगाबाद शहरातील कोरोना स्थिती सामान्य असल्यामुळे शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे अजूनही शाळा सुरू होण्याबाबत निर्णय झालेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!