🕒 1 min read
नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकापूर्वीच भारतीय कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) विश्वचषकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र टी-20 विश्वचषकात संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहली वनडे कर्णधारपदही गमावणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यास बुधवारी मान्यताही देण्यात आली. बीसीसीआयने विराट कोहलीला भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे (rohit sharma) कर्णधारपद सोपवले.
भारतीय क्रिकेटमध्ये झालेल्या या बदलाबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच बऱ्याच जणांनी आपले मत देखील मांडले आहे. दरम्यान आता या विषयावर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. नितीन राऊत यांनी विराटला कॅप्टन पदावरून हटवण्याचा प्रसंग टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत मोहम्मद शमीवर झालेल्या टीकेशी जोडला आहे. त्या प्रकरणानंतरच विराटचे कर्णधारपद जाणार हे स्पष्ट होते, असा दावा नितीन राऊत यांनी केला आहे.
नितीन राऊत ट्विटमध्ये म्हणाले की, ‘पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली महंमद शमीच्या पाठीशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधारपद जाणार. क्रिकेट नियामक मंडळात सध्या ‘शाहजादे’ राज्य करतायत ना! अशा आशयाचे ट्विट करत नितीन राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.
पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली महंमद शमीच्या पाठीशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधारपद जाणार.
क्रिकेट नियामक मंडळात सध्या 'शाहजादे' राज्य करतायत ना!
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) December 10, 2021
काय होते प्रकरण?
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतर टीम इंडिया मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. तर काही जणांनी भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर निशाणा साधला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप करण्यात आला होता.
यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शमीच्या पाठीशी ठाम उभा होता. तसेच त्याने धर्म काढणाऱ्या ट्रोलर्सना सुनावले देखील होते. ‘खूप लोक सोशल मीडियावर आपली ओळख लपवतात आणि खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. हे खूप खालच्या पातळीचं आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते, म्हणून हा ड्रामा केला जातो. खेळाडूचं समर्थन कसं करायचं ते आम्हाला माहिती आहे. सोशल मीडिया ट्रोलिंग आणि बाहेरच्या आवाजांचं आमच्यासाठी काहीही महत्त्व नाही,’ असं कोहली म्हणाला होता.
"Attacking someone over their religion is the most pathetic thing that a human being can do"#India captain Virat Kohli responds to the abuse that Mohammed Shami faced.
???? Courtesy of ICC pic.twitter.com/yiL8N4gxSM
— The Field (@thefield_in) October 30, 2021
महत्वाच्या बातम्या
- कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स चर्चेत
- ‘युपीत रामराज्य प्रस्थपित झाले, अभिनंदन योगीजी!’
- जात-पात भाषा भेद न करता मूलभूत हक्कांचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी-निलेश राणे
- ‘मनसे म्हणजे गळकं घर’
- नाशिकमधील पहिली ते सातवीच्या शाळा उघडणार ‘या’ तारखेपासून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
