🕒 1 min read
औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादमधील सभेला अटीशर्तींसह परवानगी मिळाली असून सभेसाठी केवळ १५ हजार जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. त्यातच औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtizay Jalil) यांनी राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे.
“मनसे प्रमुख राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादेत रॅलीसाठी येत आहेत. मी त्यांना इफ्तारसाठी आमंत्रित करतो. आपण एकत्र बसू, यातून देशात चांगला संदेश जाईल. ९९% लोक शांतताप्रिय आहेत, फक्त १% लोक अशांतता निर्माण करतात. माझा विश्वास आहे की, अशा १ % लोकांवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस सक्षम आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे किंवा समाजाचे असोत.”,असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी ‘जे राजकारण करण्यासाठी आले आहे त्यांनी राजकारण करावे; मात्र ज्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांना प्रार्थना करू द्यावे.’ असेही जलील यांनी म्हटले आहे. दरम्यान दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील, असा इशारा भीम आर्मीने मनसेला दिला आहे. यामध्ये सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- बंधूचे कौतुक करायचे नाही, असे राज ठाकरेंनी ठरवले असेल; जयंत पाटलांचा टोला
- “महाजेनकोचं नियोजन नीट नसल्यामुळे वीजटंचाई”- रावसाहेब दानवे
- “देवेंद्र फडणवीस वर्षभरातच मुख्यमंत्री होणार”; चंद्रकांत पाटील यांचं भाकीत
- भाजप-मनसे युतीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
- “डेडलाईनच्या काही तास आधी..”; भाजपचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
