औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारने जनतेच्या हिताचे कुठलेही निर्णय घेतले नाहीत. या कारभाराचा निषेध म्हणून आज रविवारी (दि.३०) काँग्रेसच्या वतीने शहरातील शहागंज येथील गांधी पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘वा रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा तेल’ म्हणत मोदी सरकारच्या महागाईच्या धोरणावर औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने टिका करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या ७ वर्षांच्या काळ्या कारभाराचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यभरात निदर्शने करण्यात आली. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहे. मागील सात वर्षांमध्ये मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करून टाकला आहे.
काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षांमध्ये देशाला समृद्ध स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने उभे केले. त्याची पुरती वाताहत लावून मोदींनी देश रसातळाला नेला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावेळी शहांगज येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत निदर्शने करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, किरण डोणगावकर, इक्बाल सिंह गिल, मोहसीन खान, निलेश अंबेवाडीकर, मोहित जाधव, सुरेखा पानकडे, उज्जवला दत्त, निमेश पटेल आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा तुमची खैर नाही’, खा.हेमंत पाटील यांची बँक अधिकाऱ्यांना तंबी
- ‘पीक विमा कंपन्यांची नार्को टेस्ट केल्यावरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल’, मंत्री अब्दुल सत्तार आक्रमक
- लोकनेत्याचा अनोखा सन्मान! पुण्यतिथी दिनी होणार गोपीनाथ मुंडेंच्या तिकिटाचे प्रकाशन
- अशोक चव्हाणांच्या पाठपुराव्याला यश, नांदेडला स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय मंजूर
- धक्कादायक! अपहृत मुलीच्या शोधासाठी बीडच्या पोलीस अधिकाऱ्याकडून ४० हजारांची मागणी


