Share

काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे; भाजप नेत्याचा प्रहार

Published On: 

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.

२६ जानेवारीला झालेल्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनावर अनेक गंभीर प्रश्न उठवले गेले. या आंदोलनाआडून देशाची सुरक्षा व मोदी सरकार पडण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सरकार हे चर्चेसाठी तयार असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कायद्यांमध्ये बदल करण्याच्या भूमिकेत आहे. मात्र, शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम असून हे आंदोलन अजूनही सुरु आहे.

या शेतकरी आंदोलकांवर होणाऱ्या टिकेवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘आज साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले व त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली तरी भक्त आणि दलाल माध्यमे त्यांना खलिस्तानी, देशद्रोही आणि काँग्रेसी ठरवतील… इतका स्वतः च्या डोक्यावर परिणाम करून घेतला आहे या भक्तांनी..!!’ अशी बोचरी टीका भाई जगताप यांनी केली आहे.

भाई जगताप यांच्या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ प्रभु श्रीरामचंद्र काल्पनिक होते असे शपथपत्र तुमच्या काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे… मग ते कोणाचीही बाजू कशी घेतील? काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!