🕒 1 min read
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. दारूबंदी करण्यासाठी चंद्रपुरातील महिलांनी मोठा संघर्ष केला होता. यानंतर, मागील सरकारच्या काळात २० जानेवारी २०१५ रोजी या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र आता महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठवल्यानंतर भाजपसह सामाजिक कार्यकर्त्यांनी व महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
‘नेहरूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आणि जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने चंद्रपूरमध्ये दारुबंदी उठवण्याचा अत्यंत पुरोगामी निर्णय घेतला आहे. अवघे ठाकरे सरकार सतत ‘मद्या’च्या धुंदीत असल्यामुळे अवघ्या कारभाराची स्थिती हलेडूले झाली आहे,’ असा प्रहार अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे केला आहे.
नेहरूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आणि जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने चंद्रपूरमध्ये दारुबंदी उठवण्याचा अत्यंत पुरोगामी निर्णय घेतला आहे.
अवघे ठाकरे सरकार सतत 'मद्या'च्या धुंदीत असल्यामुळे अवघ्या कारभाराची स्थिती हलेडूले झाली आहे. @OfficeofUT pic.twitter.com/T1hVSI1rqD— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 27, 2021
मंत्री विजय वडेट्टीवारांचं अजब स्पष्टीकरण !
‘जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे.’ असं पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ नियमांना व्हॉट्सऍप युजर्सनी घाबरण्याची गरज नाही; केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
- ‘शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे जिवलग मित्र होते; माझ्यात आणि राज मध्येही कॉमन पॉईंट !’
- अमेरिकन गुप्तहेर संस्था शोधून काढणार कोरोनाचा नेमका उगम कुठे झाला?
- ‘त्या’ व्हिडीओ मधील मारहाण करणाऱ्यांची होणार चौकशी – पोलिस अधीक्षक विनायक देशमुख
- हे दिवसही निघून जातील! काळजी घ्या, संयम बाळगा मनोविकारतज्ज्ञांचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
