मुंबई- राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं आहे असं म्हणत विरोधकांना टोला लगावला.
आपण सगळे करोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी होय मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली आहे, इथे अंमली पदार्थांची शेती होते आहे असं चित्र निर्माण केलं. मात्र त्यांचं हे कारस्थान आपण उधळून लावलं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा 'वाफा फ्रॉम होम'….
फुकटच्या टीमक्या… @OfficeofUT pic.twitter.com/DkP8KK98gl— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 8, 2020
दरम्यान, आता भाजपने देखील मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा कट उधळला, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पुढे बोलताना भातखळकर यांनी ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. कायद्याचा गैरवापर करून लोकांना अटक करणे, त्यांना मारहाण करणे, हे प्रकार होत आहेत ते न कळण्याइतकी जनता दुधखुळी नाही, असेही भातखळकर यांनी समाज माध्यमांवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्राह्मण महासंघाच्या आक्रमक पवित्र्यानंतर खडसेंवर आली दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ’
- राज्यपालांनी अर्णबची चिंता करू नये, त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे – भुजबळ
- खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा
- न्हावरेतील घटनेचा तपास गांभीर्याने करण्याची आढळराव पाटील यांची मागणी
- ‘तब्बल १००० युवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवण्याचा युवक काँग्रेसचा संकल्प’


