मुंबई : राज्यात कोरोना रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तर, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन देखील लागू करण्यात येत आहे. देशातील टॉप-१० ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश असल्याने राज्यातील धोका झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी याबाबत मंत्रिमंडळ बैठक देखील झाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील मंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन न लावता कडक निर्बधांची अंमलबजावणी करावी अशी मागणी मंत्र्यांनी केली आहे. तसेच, भाजप व मनसेने देखील लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने संपूर्ण राज्यात कोणते कडक निर्बंध लागणार याबाबत काहीशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेला संबोधित केले आहे. यावेळी, अमेरिका, ब्राझील यासारख्या देशांचे उदाहरण दिले आहे.
‘अमेरिकेने सात कलमी कार्यक्रम जाहीर केले आहे. यात राजकारण नको जीव महत्वाचा आहे, असं आवाहन करण्यात आले आहे. आपल्याकडे सुद्धा सर्वपक्षीयांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेले आवाहन नाही पण निदान मी केलेली विनंती मानायला हरकत नाही. जीवाशी खेळ नको, यात राजकारण आणू नका,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नद्यांचा श्वास कोंडलाय; अखेर अजित पवारांनी दिल्या जलपर्णी हटवण्याच्या सूचना
- ‘मास्क न वापरण्यात कसलं शौर्य आलंय?’ मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- …म्हणूनच मी धीर धरण्याचे आवाहन केले होते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद सुरु
- पवार-शाह भेट महाराष्ट्राच्या हिताचीच – नारायण राणे


