बुलडाणा : राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना १५ दिवस घरीच बसून राहायचे आहे. त्यामुळे किमान आतातरी गोरगरीबांचे वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी विधानसभेतील भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
चिखली विधानसभा मतदार संघातील आमदार श्वेता महाले पाटील यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘राज्य सरकारने शेतकरी व बारा बलुतेदारांना मदत जाहीर न करताच पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. १५ दिवस सर्वांना घरीच थांबून रहायचे आहे, किमान आत्तातरी गोरगरीबांच्या वीजकनेक्शन तोडणं थांबवा आणि तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पुन्ळा जोडून द्याव्यात.’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्य सरकारने शेतकरी व बारा बलुतेदारांना मदत जाहीर न करताच पुन्हा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. १५ दिवस सर्वांना घरीच थांबून रहायचे आहे, किमान आत्तातरी गोरगरीबांच्या वीजकनेक्शन तोडणं थांबवा आणि तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पुन्हा जोडून द्याव्यात @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
— Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) April 13, 2021
वीज कनेक्शन तोडण्यावरुन राज्यात महाविकास आघाडी सरकारवर या आधी देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. अधिवेशन काळात विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे अधिवेशन होईपर्यंत वीज कनेक्शन तोडणी थांबवण्यात आली होती. तसे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र, अधिवेशन संपताच, वीज बिल वसूली मोहिम पुन्हा सुरू करण्यात आली होती. आता लॉकडाऊन काळात तरी वीज तोडणी करू नये अशी मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मरकजमध्ये नमाज पठणावरून केंद्राचे घुमजाव, सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदीच
- राज्य सरकारचं पुण्याकडे दुर्लक्ष ; महापौर मोहोळ यांचे टीकास्त्र
- …आता महिलांनी उपचारासाठी सेंटरवर जावं कि घरीच मरावं ? चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
- १६ खासगी रुग्णालय आता डीसीएचसी सेंटर! ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा
- मोदींना कधी एटीएमच्या किंवा बँकेच्या रांगेत पाहिलं आहे का? : राहुल गांधी


