मुंबई : गेले काही महिने राज्यात ईडीमुळे वातावरण चांगलंच तापलेलं असताना आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता भाजपातील नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे आमदार व नेते ऍड. आशिष शेलार यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. ‘राऊतांनी दमबाजी करू नये, आपल्या दामदमडीचा हिशोब द्यावा. त्यांच्या डंबाजिला भाजप घाबरणार नाही. सीबीआय, ईडी, यासारख्या तपास संथांवर दबावतंत्र वापरण्याचं घाणेरडं राजकारण शिवसेना करत आहे. शिवसेना नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकलीये. जर कर नसेल तर दर कशाला. आणि दर असेल तर मग असा डराव डराव होतो जो राऊतांनी केलाय’ अशी जळजळीत टीका शेलारांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, उगाच कांगावा कशाला करताय?’
- भेटवस्तू द्यायला आलेला सांताक्लॉज निघाला कोरोनाबाधित
- ‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!
- ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेच्या चाैंडी गावात पुतण्यानेच थोपटले काकांच्या विरोधात दंड
- ‘राऊत फक्त बडबड करतात, तर ईडी पुरावे असल्याशिवाय चौकशी करत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

