🕒 1 min read
रत्नागिरी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ जुलैरोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. एक दिवसाच्या दौऱ्यात राज्यपाल तळिये व चिपळूणला भेट देणार आहेत. राज्यपाल कोश्यारीसोबत भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनाही पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे.
या दौऱ्यासाठी आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोबत प्रस्थान केले आहे. पुराचा फटका बसलेल्या कोकणातील महाड, तळये, चिपळूण या भागाचा पाहणी दौरा करून राज्यपाल आणि आशिष शेलार परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
पुराचा फटका बसलेल्या कोकणातील महाड, तळये, चिपळूण या भागाचा पाहणी दौरा आज मा. राज्यपाल @maha_governor भगतसिंग कोश्यारी @BSKoshyari जी करीत असून त्यांच्या सोबत आज मलाही या दौऱ्यात सहभागी होऊन परिस्थितीची दाहकता समजून घेण्याची संधी मिळाली आहे. pic.twitter.com/9EeTMcnIJS
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 27, 2021
दरडग्रस्त तळीये, चिपळूण या भागात अजूनही मदतकार्य सुरु आहे. या भागातील नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहे. तर राज्यातील पूरग्रस्तांना २०१९ च्या जीआरप्रमाणे मदत दिली जाणार असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. या अगोदर मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष्याच्या नेत्यांनी या भागाचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली आहे. आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी समवेत भाजप प्रवक्ते आशिष शेलार कोकण भागातील दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. याबात आशिष शेलार यांनी समाज माध्यमावर माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशवासियांची माफी मागणाऱ्या तलवारबाज भवानी देवीला पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
