🕒 1 min read
नवी दिल्ली: देशात सध्या केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. देशभरात या योजनेविरोधात तरुणांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. १३ राज्यांत तरुण याविरोधात निषेध व्यक्त करत आहेत. यावरच आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी थेट पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) सवाल केला आहे.
“चार वर्षे देशाचे रक्षण केल्यानंतर या तरुण माजी सैनिकांनी अदानी आणि अंबानींच्या घराबाहेर नोकरीच्या रांगेत उभे राहावे किंवा भाजपच्या कार्यालयाबाहेर चौकीदारी करावी असे तुम्हाला का वाटते मोदी जी?”, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
.@narendramodi, आप ये क्यों चाहते हैं की चार साल तक देश की रक्षा करने के बाद, यही युवा पूर्व सैनिक या तो अडानी और अम्बानी के घर के बाहर नौकरी की लाइन में खड़ा हो, या बीजेपी के दफ्तरों के बाहर चौकीदारी करे।
1/n— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 20, 2022
हे सरकार तरुणांच्या भवितव्याशी आणि सैन्याच्या ताकदीशी खेळून काही हजार कोटी रुपये वाचवेल, पण त्याचा फायदा लष्कराला किंवा गरीब शेतकऱ्याला कधीच होणार नाही, फायदा त्या दोन क्रोनी व्यावसायिकांना होणार आहे. मोदीजींनी नोटाबंदीनंतर 50 दिवस मागितले होते, ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. लॉकडाऊनचा परिणामही आपण सर्वांनी पाहिला आहे. पण सरकारलाच आपल्या चुकांची पुनरावृत्ती करायची आहे. देशातील तरुणांना मारायचे आहे. तरुण हे भारताचे भविष्य आहेत, तुमची आणि तुमच्यासोबत वारंवार मुदतवाढ घेणारे निवृत्त आयएएस अधिकारी नाही. तुम्ही या तरुणाचा आवाज ऐका आणि त्यांच्या मागणीचे पालन करा. ही अग्निवीर योजना तात्काळ मागे घ्या. अशी मागणी असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- उद्योजक आनंद महिंद्रा यांची अग्नीवीरांसाठी मोठी घोषणा, म्हणाले…
- Dipali Syed VS Raj Thackeray : “राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील”, दिपाली सय्यद यांचा खोचक टोला
- “…हे संविधानाच्या कोणत्या कलमात बसते?”, संजय राऊतांचा सवाल
- Legislative Council elections : निवडणुकीपूर्वी भाजप उमेदवाराचे गणरायाला साकडे; ट्वीट करत म्हणाले..
- “काळ आला होता भाऊवर पण बळी मिशीवाल्या मावळ्याचा जाणार”, अनिल बोंडेंचा ‘मविआ’वर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

