Share

“काळ आला होता भाऊवर पण बळी मिशीवाल्या मावळ्याचा जाणार”, अनिल बोंडेंचा ‘मविआ’वर निशाणा

Published On: 

मुंबई: आज (२० जून) विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी रिंगणात एकूण ११ उमेदवार उतरले आहेत. त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना भाजप नेते अनिल बोंडे यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

“काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”, असे सूचक ट्वीट खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. आता या ट्वीटमधील भाई म्हणजे भाई जगताप आणि मिशीवाला मावळा म्हणजे सेनेचे सचिन अहिर आहे काय? अशा चर्चा आता रंगत आहेत.

दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी तर भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप उभे राहिले आहेत. कॉंग्रेसला दुसऱ्या जागेसाठी किमान ८ मते आवश्यक आहेत. भाजपला स्वतःचे संख्याबळ आणि सोबतचे अपक्ष मिळून ११२ एवढे संख्याबळ असल्याने पाचव्या जागेसाठी १८ मतांची गरज आहे. आज सकाळी ९ वाजता विधानभवनात मतदानास सुरुवात होईल, तर रात्री साधारण ८ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!