Share

महाराष्ट्रात सत्ता नाही म्हणून जागा मिळेल तिथं नाक खूपसतात; अशोक चव्हाणांची भाजपवर टीका

Published On: 

नांदेड : देगलूर-बिलोली मतदार संघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुभाष साबणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर हे उमेदवार आहेत. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे अंतापूरकरांच्या प्रचारासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी प्रचारसभेत बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

भाजपला महाराष्ट्रात सत्ता नाही त्यामुळे जिकडे जागा रिकामी झाली तिकडं नाक खुपसायचं सुरु आहे. खरं तर भाजपने विचार करायला हवा होता की, रावसाहेब अंतापूरकरांचं निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली आहे. पक्षाचा विषय येतो पण कधीतरी पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. एखाद्या घरातील कर्ता माणूस गेलाय. त्याच्या घरातला मुलगा उभा आहे. सहानुभूती म्हणून तरी आपण विचार केला पाहिजे पण भाजपला ती सुद्धा दया आली नाही आणि विरोधात माणूस उभा केला, असं म्हणत भाजपवर टीका केली आहे.

स्वत:कडे माणसं शिल्लक नाहीत म्हणून बाहेरुन माणूस आणला आणि उभा केला. हा तर उपऱ्यांचा पक्ष झाला. बाहेरची माणसं ओढायची तोडायची फोडायची आणि आपलं सरकार कसं येईल या भ्रमात ही मंडळी आजूनही मी येणार मी येणार हे स्वप्न अजूनही कायम डोक्यात ठेवलं आहे. आणि संपूर्ण नांदेड पालथं उलथं घालत त्या मतदार संघात फिरण्याचं काम सुरु झालं आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!