नवी दिल्ली: भारत आणि चीनच्या सीमाप्रश्नावरून (Indo-China Border) नेहमीच तानावाचे वातावरण बघायला मिळते. सीमाप्रश्नी अनेक चर्चा आणि बैठका होत असतात, मात्र यातून काहीही निष्पन्न अजूनही झालेलं नाही. या तानावाच्या परिस्थितीतून युद्धाची सुद्धा वेळ अनेकवेळा आली आहे. भारत आणि चीन यांच्यादरम्यान, बुधवारी चौदावी सैन्यस्तरावरील चर्चा पार पडली. लष्करप्रमुख एम.एम. नरवणे हे स्वतः देखील या चर्चेत सहभागी झाले होते.
बैठकीनंतर एम.एम. नरवणे (M.M. Naravane) यांनी महत्वाची माहिती दिली आहे, चर्चा हा प्रश्न सोडवण्यासाठी, वाद मिटवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहेच मात्र बऱ्याचदा चर्चेतून प्रश्न सुटत नाहीत. अशा वेळी युद्ध करायची वेळ येते, असं नरवणे म्हणाले. तसेच जराही दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही अशा कडक शब्दात त्यांनी पाकिस्तानला देखील खडे बोल सुनावले आहेत.
#WATCH | "War or conflict is always an instrument of last resort. But if resorted to, we will come out victorious," says Army Chief Gen MM Naravane while answering a question regarding the situation on the northern border pic.twitter.com/s3zLt0U9S1
— ANI (@ANI) January 12, 2022
पुढे बोलताना नरवणे म्हणाले, चर्चा आणि बैठकांमधून जर प्रश्न मिटले नाहीत आणि युद्ध करायची वेळ आलीच तर तेव्हा भारताचा विजय होईल, असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना नरवणे म्हणाले, पश्चिम सीमाभागातील नियंत्रणे रेषजवळ परिस्थिती सुधारणा होत असली, तरी तिथे दहशतवादी कारवाया वाढल्याचंही त्यांनी यावेळी महणलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- औरंगाबादेतील गर्दीला ‘लक्ष्य’ करणार जिल्हाधिकार्यांनी स्थापन केलेली भरारी पथके..!
- ‘टेकफॉग अॅपचा विरोधकांविरुद्ध वापर करणाऱ्या भाजपवर कारवाई करा’; सतेज पाटलांची मागणी
- भाजपच्या ‘या’ मंत्र्याने दिला राजीनामा; शिवसेनेने म्हटले ‘उत्तर प्रदेश.. परिवर्तन की ओर..’
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर ऑक्सिजन सपोर्टवर ; प्रकृतीत सुधारणा, भाची रचना शहाने दिली माहिती
- मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याचं सावट; काय आहे प्रकरण जाणून घ्या


