🕒 1 min read
सांगली : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिव वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.व आता NIA सचिन वझे यांना अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीचं तापलं असल्याचे चित्र दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कमकुवत असल्याचं सांगताना आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, ‘राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले सुद्धा आमच्या कडे येऊ शकतात. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पण टिकू शकणार नाही. कारण त्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत, असा दावाही रामदास आठवले यांनी यावेळी केला. त्याचबरोबर ‘गो कोरोना गो’ या प्रसिद्ध घोषणेनंतर त्यांनी आणखी एक नवीन घोषणा दिली आहे. यावेळी त्यांनी ‘गो कोरोना नो कोरोना’ अशी नवीन घोषणा दिली आहे.
सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. तसेच कोरोना विषाणूचे रुग्णही वाढत चालले आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असंही आठवले यावेळी म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आमचं समर्थन आहे. मी स्वतः याबाबतची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लातूरकरांनो खबरदार! घराबाहेर पडाल तर…
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
