🕒 1 min read
औरंगाबाद : मागील वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० जानेवारी २०२१ पर्यंत प्रवेश प्रक्रिया चालली. यंदा मात्र वेळेत प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संभाव्य वेळापत्रक जाहिर करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.
आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. नव्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शाळांना ९ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्यासाठीची मुदत देण्यात आली आहे. तर पालकांना ९ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
एकदाच आलेल्या अर्जातून सोडत काढण्यात येईल. ५ व ६ मार्च दरम्यान लकी ड्रॉ म्हणेज सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली. यात पात्र पाल्यांच्या पालकांनी ९ ते २६ मार्च दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित करायचे आहेत. यात प्रवेश झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील पहिला टप्पा २७ मार्च ते ६ एप्रिल, दुसरी प्रतिक्षा यादी १२ ते १९ एप्रिल, तिसरी प्रतिक्षा यादी २६ एप्रिल ते ३ मे आणि चौथी प्रतिक्षा यादी १० ते १५ मे दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी दिलेल्या पत्रात दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये शेवटचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी नाहीच !
- वाई न्यायालयाकडून उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- तुमच्या ट्विटर अकाऊंट मध्ये होणार ‘हा’ बदल…
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
