अहमदनगर: केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
अण्णा हजारेंनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गुरुवारी भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे अण्णा हजारे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी महाजन भल्या सकाळीच अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले होते. महाजन यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर देखील अण्णांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर याच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीचा एक ड्राफ्टही अण्णांना देण्यात आला. तरी देखील अण्णांनी उपोषण करणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर भाजपचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता दिल्लीतून हे उपोषण थांबवण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय कृषि राज्य मंत्री कैलास चौधरी आज राळेगणसिद्धीत येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- आज पासून संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधीपक्षांकडून बहिष्कार !
- तेंडूलकर, द्रविड यांच्या ‘मोठ्या’ विक्रमावर विराटची नजर
- उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६७४ कोटी रुपये निधीची तरतूद
- आयपीएल पुन्हा अमिरातीत होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

