Share

‘सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी त्यांच्या वडिलांना विचारावे’ ; चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत. शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यानंतर सेनेच्या खासदार भावना गवळी यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. दरम्यान यावरूनच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या नागपूर दौर्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या कि, ‘ईडीचा कायम राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच झालाय, आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असं मी कधीच पाहिलं नाही. कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही.’ असे मत त्यांनी मांडले होते.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार मधील लोकांना ईडीचा फायदा होणार असेल वाटत असेल तर त्यांनी पेढे वाटावे.. सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की सत्तेचा गैरवापर या आधी इतका कधीच झाला नाही तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारा की इंदिरा गांधी यांनी सत्तेचा गैरवापर कसा केला गेला.’ अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी आता सुळे यांना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!