मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकार फोन टॅपिंग प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयकडे देणार आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवरून सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने फोन टॅपिंग आणि पोलिस बदल्यांबाबतचे कागदपत्रे मागितले होते.
या कागदपत्रांचा देशमुख यांच्या प्रकरणात काहीही संबंध नाही, असा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. त्यामुळे कागदपत्रे मिळण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका केली. सीबीआय आणि पोलिसांनी यावर एकत्रित तोडगा काढावा, असे न्यायालयाने मागील सुनावणीला सुचविले होते.
सीबीआयने मागणी केलेल्या कागदपत्रांमध्ये फोन टॅपिंग प्रकरणाचा समावेश आहे. मुंबई पोलिस या प्रकरणात तपास करीत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रारंभी कागदपत्रे देण्यासाठी नकार दिला होता. मात्र आता उच्च न्यायालयात राज सरकारने रश्मी शुक्ला यांच्या अहवालासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयला देण्याची राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. प्रकरणात पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे. याआधीच सीबीआयला महत्वपूर्ण वाटत असलेले कागदपत्रे राज्य सरकारने हस्तांतरित केल्यास देशमुखांविरोधात मोठा पुरावा सीबीआयला मिळेल, असं म्हटलं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीय पक्षात मतभेद असतात, पण…’; बापटांनी राणेंचे कान टोचले
- भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही – नवाब मलिक
- ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले?’; वरुण सरदेसाईंचा प्रतिसवाल
- ‘आयुष्यात ‘पॉज’ बटण दाबू शकत नाही’; शिल्पा कठीण काळातही राहते आनंदी
- आयसीसी क्रमवारीत रिषभ पंतची घसरण, ‘या’ खेळाडूने दिला धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
