मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंड येथे पोहोचला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. काही दिवसापुर्वी आयसीसीने या सामन्यासाठी काही नियमावली जाहीर केली होती. आता यात आणखी एका नियमाची भर पडली आहे.
आयपीएल स्थगितीनंतर संपुर्ण क्रिकेटजगताचे लक्ष हे जागतीक कसोटी क्रिकेट चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यासाठी आयसीसी ने एक दिवस राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अतिरिक्त दिवसामुळे फॉलोऑनच्या नियमात कोणताही बदल केला जाणार नाही असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. जर पहिला दिवस पावसाने वाया गेला तरी फॉलोऑनच्या नियमात कुठलाही बदल होणार नाही असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसीच्या नियमानुसार फॉलोऑनसाठी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला २०० धावांची आघाडी हवी असते. मात्र सामन्याच्या दिवसात बदल झाला तर फॉलोऑनच्या नियमात बदल होत असतो.
मात्र डब्ल्युटीसी सामन्याच्या अंतिम सामन्यासाठी पहिला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ नाही झाला तर सामन्यातील खेळांच्या दिवसानुसार फॉलोऑनच्या नियमात बदल केला जाईल. मात्र जर पहिला दिवस पावसामुळे वाया गेला तर फॉलोऑनच्या नियमात बदल केला जाणार नाही. तसेच ज्या दिवशी सामन्यात एक जरी चेंडु खेळला गेला तो पुर्ण दिवस ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच अतिरिक्त दिवसाचा उपयोग करण्याबाबत निर्णय हा पाचव्या दिवसातील अखेरच्या तासात घेतला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नावे ठेवणारे आता आमचेच अनुकरण करत आहेत’, विनायक मेटेंचा छत्रपती संभाजीराजेंना टोला
- मोठी बातमी! पंतप्रधान मोदी आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार
- ‘मुंबईतील नोकरदार वर्ग ऑफिसला कसा जाणार?’, काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्री ठाकरेंना घरचा आहेर
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
- ‘ट्विटरच्या जिवावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का?’ शिवसेनेचा मोदींना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
