मुंबई : ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटवरुन देशात सध्या वातावरण तापलं आहे. यावरुन शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. आता भाजपला ट्विटरचे ओझे झाले असून हे ओझे कायमचे फेकून द्यावे या निर्णयापर्यंत मोदी सरकार आले आहे,’ अशी टीका शिवसेनेनं मोदी सरकारवर केली आहे.
‘ट्विटरचे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले आहे. कारण भाजपविरोधकांनी या माध्यामांचे कोपरे बळकावून भाजपच्या खोट्यानाट्या प्रचारास उत्तर देणे सुरु केले. अरे ला कारे जोरात सुरु आहे व अनेक ठिकाणी ट्विटरच्या रणमैदानातून भाजपला, त्यांच्या सरकारला माघार घ्यावी लागत आहे आणि त्यांच्या ट्विटर सेनेचीही दाणादाण उडत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेनं भाजप व मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.
तेव्हा भाजपवाल्यांना गुदगुल्या झाल्या
राहुल गांधी यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? मनमोहन सिंगांसारख्या ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? उद्धव ठाकरे यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या ‘ट्विटर’ वगैरेंचा वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या.
जोपर्यंत हे हल्ले एकतर्फी पद्धतीने सुरू होते तोपर्यंत भाजपवाल्यांना गुदगुल्या होत होत्या, पण आता त्यांच्या सायबर फौजांसमोर विरोधकांचे त्याच ताकदीचे सैन्य उभे करून हल्ले सुरू झाले तेव्हा भाजपच्या तंबूत घबराट झाली, असे अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी झाल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘सत्ता नसल्याने फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापनेसाठी ते तळमळत आहेत’, खडसेंची कोपरखळी
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेवर भर
- न्युझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना अनिर्णीत
- पदार्पणातच कारकिर्द संपुष्टात! ओली रॉबीन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबीत


