मुंबई: विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालावर सरकारने आतापर्यंत निर्णय घ्यायला हवा होता, असे सरकारला सुनावतानाच सरकारच्या निर्णयापर्यंत कर्मचारी रुजू झाले तर आभाळ कोसळणार आहे का? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरही बोट ठेवले. या प्रश्नावर आत्महत्या हा उपाय नाही, तर कामावर रुजू होणे हा उपाय आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्त्या हि भयंकर गोष्ट आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी भडकावू भाषणाला बळी न पडता कामावर रुजू व्हावे. महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे”, असे मिटकरी यावेळी म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

