Share

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा २५ किलोमीटरचा पायी मोर्चा

Published On: 

🕒 1 min read

अंबाजोगाई : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा देण्यास कंपनीकडून जाणिवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने शेतकरी संतप्त झाले. परिसरातील चार गावांतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी विमा मागणीसाठी अपेगाव ते अंबाजोगाई असा २५ किलोमीटर अंतराचा पायी मोर्चा काढला.

मागच्या वर्षी जिल्ह्यात तिव्र दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे विमा संरक्षण केले होते. दरम्यान, यंदा मे महिन्यापासून ओरिअंटल इन्शुरन्स कंपनीने विमा मंजूर करण्यास सुरुवात केली. परंतु, अपेगाव, धानोरा, कोपरा व अंजनपूर (ता. अंबाजोगाई) येथील बहुतांश शेतकऱ्यांना विविध कारणांनी विमा मंजूर झाला नाही. शेतकरी मागील दोन महिन्यांपासून विमा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी, कंपनीचे कार्यालय आणि शासकीय कार्यालयांत खेटे मारत आहेत.

परंतु, त्यांच्या मागणीला दाद दिली जात नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी अपेगाव ते अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालय असा २५ किलोमीटर अंतराचा पायी मोर्चा काढला. मोर्चात आपेगाव, धानोरा, कोपरा,अंजनपुर येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!