🕒 1 min read
औरंगाबाद : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर सडकून टीका केली. तसेच शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं म्हणत आहेत आणि शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडायचं पापही भाजप करत आहे. त्यामुळे या पापाचे खरे धनी भाजपच आहे, जर तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर तुम्ही शिवसेना का फोडताय? शिवसेना नेत्यांमागे तपास यंत्रणा का लावताय?” असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
“आशिष शेलार यांची प्रतिमा वाचाळ अशी तयार झाली आहे. ते भाजपने सोडलेलं एक पिल्लू आहे. कालच्या भाषणात त्यांनी असं म्हटलं कि आम्हाला शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या स्वप्नातला भारत तयार करायचा आहे. याचा अर्थ असा कि मोदींचा करिष्मा आता संपला आहे. स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांच्या नावावर मतं मागता येत नाहीत. म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव पुढे करून मतं मागण्याचा प्रकार सुरु आहे. भाजपचा हा भंपकपणा अक्ख्या महाराष्ट्राला माहित आहे”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Shirsat | अतुल सावे मागून आले अन् मंत्री झाले, आता आमच्याकडे पण पहा जरा – संजय शिरसाठ
- सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच सरकारची सर्वात मोठी समस्या – नितीन गडकरी
- Nilesh Rane | रत्नागिरीमध्ये निलेश राणेंचा ग्रामस्थांनी अडवला ताफा
- Amravati । अमरावतीत आज देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला होणार, आमदार रवी राणा यांच्यावतीने आयोजन
- उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास- उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
