Share

हैद्राबाद-दिल्ली सोबतच आता मुंबई-औरंगाबाद विमानसेवाही होणार सुरु!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाने वर्षभरापासून विस्कळीत झालेली विमानसेवा आता हळूहळू पूर्ववत होत आहे. औरंगाबाद विमानतळावरुन १२ जुलैपासून मुंबई-औरंगाबाद-मुंबई हे विमान सुरू करण्याची घोषणा इंडिगो कंपनीकडून नुकतीच करण्यात आली आहे. या विमानाचे वेळापत्रक बदलण्यात आले असून मुंबईहून औरंगाबादला येणार्‍या प्रवाशांसाठी हे विमान अधिक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

पूर्वी औरंगाबाद विमानतळावरून इंडिगो कंपनीचे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, बंगरूळू आणि अहमदाबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू होती. मात्र कोरोना संकटामुळे या मार्गावरील विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत दिल्लीनंतर आता हैदराबाद या दोन शहरांसाठी देखील इंडिगोची विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद ते मुंबई मार्गावर सध्या एअर इंडियाची मुंबई औरंगाबाद दिल्ली ही एकमेव विमान सेवा सुरू आहे. या विमानाला प्रतिसाद जास्त आहे. औरंगाबाद मुंबई मार्गावर इंडिगो विमान पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर आगामी १२ जुलै पासून मुंबई औरंगाबाद मुंबई हे विमान आठवड्यातील चार दिवस चालविण्यात येणार असल्याची माहिती इंडिगो कंपनीकडून देण्यात आली आहे. तसेच येत्या ५ जुलैपासून दिल्ली आणि हैदराबाद शहरासाठी विमान सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिक आणि पर्यटकांना या विमानसेवेचा मोठा लाभ होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!