Share

Ajit Pawar | सत्ता आली म्हणून मस्ती आली का? ; अजित पवार शिंदे गटावर संतापले

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या सरकारला येऊन काही दिवस झाले आहेत. मात्र त्यांचे काही आमदार आतापासून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणी म्हणतं हात तोडा, पाय तोडा…हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे काय चालले आहे? एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना हे बरोबर वाटते का?

एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते आता कायदा हातात घेत आहेत. सरकारमध्ये आल्यानंतर त्यांना मस्ती आली आहे का? या लोकांना कसे रोखले जात नाही? हे सर्व महाराष्ट्र पाहत असल्याचे ते म्हणाले. १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो, मग आमदारांची भाषा अशी कशी?

सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका –

अजित पवार म्हणाले की, सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, त्याशिवाय इतरही मुद्दे आहेत. मात्र आता अचानक वंदे मातरम म्हणण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्याला विरोध नाही, पण तुम्ही महागाईवर बोला, पेट्रोल-डिझेलवर बोला. सरकारमध्ये नसताना त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्या सरकारमध्ये येऊन विसरले का?, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!