Share

‘सामान्यांचे हाल करणारा लॉकडाऊन पुन्हा नको’, लॉकडाऊनला अजित पवारांचा विरोध

Published On: 

मुंबई : देशांतर्गत वाहतूक सुरु झाल्यानंतर त्याचबरोबर कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोरोना पुन्हा एकदा थैमान घालणार का ? पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट येत असताना पुन्हा एकदा राज्याचे मंत्री लॉकडाऊन बाबत वक्तव्यं करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. ‘गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको’ म्हणत आपला विरोध दर्शवला आहे.

गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट गरिबांची अवस्था फारच बिकट झाली आहे. रोज काम केले तर त्यांचे घर चालते अशांना लॉकडाऊनचा फटका बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाऊन घोषित केले तेव्हा हा सर्व जण आदेश पाळत आले आहेत, असे सांगत कोरोना वाढू नये याची काळजी घेऊयात असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!