Share

‘महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर बेळगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावात सोमवारी सकाळी 6 पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. यावर प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरवातीला या घटनेचा अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना, राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत. कर्नाटक सरकारने आणि केंद्र सरकारने घटनेकडे गांभीर्याने पहावे, दोषींना शोधून काढून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही अजित पवारांनी केली आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी मोठे आदर्श आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!