मुंबई : सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडतोय. तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वादळ असता निवळले असून त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्याचमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून विदर्भासहीत अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय.
पुढील २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार तसेच अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. फक्त एवढेच नाही तर ‘गुलाब’ चक्रवादळ आता नव्याने अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचे नाव ‘शाहीन’ असे असणार आहे. हे नाव ओमानने दिलेले आहे. या वादळाच्या निर्मितीसंदर्भात पुढील काही दिवस फार महत्वाचे ठरणार असल्याचे सांगितल्या जात आहे.
दरम्यान, राज्यात पुढील २४ तासात गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे विदर्भात प्रभाव कमी असणार असून बुधवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव राहिल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळे करण्याच्या विविध कला ठाकरे आणि पवारांनी निर्माण केल्यात’
- आर आर पाटलांच्या सख्ख्या भावाकडे सोमय्यांनी केली हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार
- ‘मुंबै बँकेच्या बदनामीवरून उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा दावा’, प्रवीण दरेकरांची माहिती
- ‘सोमय्यांच्या मागे आम्हीच हे फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी खुलेपणाने सांगावे’, सतेज पाटलांचे आव्हान
- ‘शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे’, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला चिमटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
