Share

‘शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे’, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला चिमटा

Published On: 

मुंबई : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेकांची पिके सध्या पाण्यातच आहे. लवकरात-लवकर शासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा धरण आज पूर्ण भरले. तसेच बीडमधील माजलगाव धरणाचे दरवाजे आज पुन्हा उघडण्यात आले आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यात सोयाबीन, कपासी आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करुन मदत देण्यासाठी केंद्राकडून ७ हजार कोटींची मागणी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘मराठवाडा, विदर्भातील महापुराची परिस्थिती पाहता सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. केवळ केंद्र सरकार मदत करत नाही अशी टीका करत फिरू नये, तर सरकारने आधी मदतीचा हात पुढे करावा, असा सल्ला त्यांनी दिला. शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे, असा चिमटाही मुनगंटीवार यांनी काढला.

दरम्यान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत देण्यात येते ते नियम जुने आहेत. त्यामुळे त्यात बदल करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आमचे प्रयत्न आहे असेही वडेट्टीवार म्हणाले. पंतप्रधानांनी गुजरातला १ हजार कोटी दिले होते, त्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रातील नुकसान पाहता किमान ७ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!