Share

अतिक्रमणे काढण्यासंदर्भात लेखी आश्वासनानंतर ग्रामपंचायत सदस्याने आमरण उपोषण सोडले

Published On: 

सिल्लोड : अनाड या गावांतील अनधिकृत अतिक्रम मंदिरे व देवालये यांच्या आजूबाजूला केलेले अवैध अतिक्रमणाविरोधात ग्रामपंचायत सदस्य मनिषा संदीप मानकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर १५ जून पासून आमरण उपोषण सुरु केले. मात्र ग्रामपंचायतीने सर्व अतिक्रमणे काढण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालयाने विचार विनिमय करुन सर्व अतिक्रमण मोजमाप करण्यासाठी, नोटिसा बजावण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्हाला २ महिने देऊन सहकार्य करावे दोन महिन्यातच आपल्या सर्व मागण्या मार्गी लागतील असे लेखी पत्र दिले. त्यावर सायंकाळी साडेआठ वाजता हे उपोषण अजिंठा पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल मा.कविता चाथे, व सरपंच सौ.रामकोरबाई बिरारे यांचे हातून लिंबू पाणी पाजून सोडण्यात आले.

या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी आर. जी. पठाण, ग्रामविकास अधिकारी डी. जे.बोराडे, उपसरपंच प्रविण जाधव, ग्रामपंचायत सदस्य गजानन गदाई, ग्रा.पं.भागवत शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ पवार, पोलीस कॉन्स्टेबल के.जी.चव्हाण, माजी सरपंच तेजराव पवार, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गोंडे, विनायक पाचिंगे, महाराष्ट्र जोशी समाज समितीचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू मुके, योगेश भिसे, गणेश पाचिंगे, श्रावण भिसे, श्रीकांत मानकर, संजय यदमळ आदींसहित सर्व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!