Share

राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक निर्बंधांचा इशारा

Published On: 

मुंबई: राज्यात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना अधिक पसरू नये म्हणून संचारबंदी, जमावबंदी तसेच शाळा महाविद्यालये देखील तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती.

राज्यात पुन्हा वाढणाऱ्या कोरोना बाबत ही बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी मंत्रिमंडळाला वरील बाबी सांगितल्या आहेत. तसेच राज्यात वैद्यकीय उपकरणांसह ऑक्सिजनच्या रोजच्या गरजेत वाढ झाली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात बोलताना म्हणाले, ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रिक टनांपर्यंत वाढल्यास कडक निर्बंध घालावे लागतील. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरणाला (Vaccination) गती देऊन आवश्यक ती पावले उचलावीत. पुढे ते म्हणाले की, पूर्णपणे लसीकरण झालेल्या करोना रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता नसते. परंतु लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!