🕒 1 min read
नागपूर: नांदगाव, वारेगाव येथील प्रदूषणाचा मुद्द्यावरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारी येथे भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाजनकोने टाकलेल्या मंडपात न जाता थेट गावकऱ्यांनी पंप हाऊसजवळ टाकलेल्या मंडपाला भेट दिली.
नांदगाव या गावातील दोन विहिरी असलेल्या पेंच नदीत थेट राखेच्या बंधाऱ्यातील राख सोडली जाते. ते ठिकाण पर्यावरणमंत्र्यांना येथील गावकऱ्यांनी दाखवले. या राखेच्या बंधाऱ्यामुळे संपूर्ण गावात तसेच त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पूर आल्याची माहिती ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यानं दिली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
Today I visited Nandgaon village in Nagpur district & heard the people, especially women from the villages. After receiving multiple complaints from Nandgaon and taking action, decided to take stock of the ground situation. These are the following decisions we have taken; pic.twitter.com/vjH0DAfYti
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 14, 2022
आदित्य ठाकरे येथील ग्रामस्थांशी बोलताना थेट जमिनीवर बसले होते. यावेळी राखेबद्दल प्रश्न गावकऱ्यांकडून विचारण्यात आला. राख टाकणे बंद करण्याचे आदेश तात्पूरते आहेत की कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश आहेत, असा प्रश्न महिलांच्यावतीने प्रदूषणमुक्तीच्या लढ्यात समोर असणाऱ्या अश्विनी ठाकरे यांनी विचारला. यावर हे आदेश कायमस्वरुपी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
महत्वाच्या बातम्या:
- रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे लवकरच भत्ता वाढवणार
- निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर जुमला ??, चीनच्या ५४ अॅपवर भारत सरकारची बंदी
- एक राजा एक जयंती; शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्याची विनोद पाटलांची विनंती
- बुलडाण्यात वाईन विक्री विरोधात भाजपच्या महिला आक्रमक
- काँग्रेस नेत्याची भाजप आणि नितीन गडकरींवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
