🕒 1 min read
शिंधुदुर्ग : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील भाजपा व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. तुम्ही लिहून घ्या हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार आहे,” अशी मोठी राजकीय भविष्यवाणी आदित्य ठाकरेंनी केली. ते सोमवारी (१ ऑगस्ट) सिंधुदुर्गमधील शिवसंवाद यात्रेदरम्यान आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आदर्श बांदेकर व इतर अनेक नेते उपस्थित होते.
सध्या दोन लोकांचं जंबो मंत्रीमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही. कुणी कुणाला बोलू देत नाही. सध्या त्यांचं लक्ष घाणेरड्या राजकारणावर आहे. मी आजोबा आणि वडिलांसोबत लहानपणापासून फिरलो, पण इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट
- Kirit Somaiya “आगे आगे देखो होता है क्या” ; संजय राऊतांच्या अटकेवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया!
- Rajan Vichare | “दिघे साहेब घात झाला… गद्दारीचा शिक्का बसला, छातीवर नाही पाठीवर वार झाला” ; राजन विचारेंचे भावूक पत्र
- Tushar Bhosale | संजय राऊत समस्त हिंदू समाजावर कलंक – आचार्य तुषार भोसले
- Sanjay Raut ED Inquiry | ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे – प्रियांका चतुर्वेदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
