Share

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचे राज्य सरकारवर धक्कादाक आरोप, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी वेदांता फॉक्सकाॅन मुळे राज्याचे किती नुकसान झाले याची आठवण करून देत अनेक आरोप केले आहेत. हा प्रकल्प राज्या बाहेर गेल्याने किती रोजगार गेले याची देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी आठवण करून दिली. मात्र आदित्य ठाकरे केवळ यावरच थांबले नसून वर्सोवा बांद्रा सी लिंक विषयी सर्वात मोठा आरोप त्यांनी एकनाथ शिंदे सरकार अर्थात राज्य सरकारवर केला आहे.

वेदांता फॉक्सकॉनवरुन राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही, बल्कड्रग पार्कही राज्याचा बाहेर गेला, त्यावरही उत्तर नाही, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्री दिल्लीत स्वत:साठी गेले की महाराष्ट्रासाठी, शिंदेची दिल्लीवारी आठवी आहे आणि २ वाऱ्या लपून छपूनसह १२ वी वारी, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यातील किती प्रकल्पांना खोके सरकारने स्थिगिती दिली? हे पाहणे हा देखील एक सवाल आहे. वर्सोवा ब्रांदा सी लिंक हे देखील काम बंद पाडले असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

दरम्यान, वर्सोवा ब्रांदा सी लिंक हे काम मुंबईत आणि मुलाखती चेन्नईत होत आहेत, वेदांताच्या अध्यक्षांना महाराष्ट्राला काहीतरी देऊ हे ट्ववीट करण्यासाठी दवाब आणला, वेदांता फॉक्सकॉनवरुन राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर आलेलं नसल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!