🕒 1 min read
मुंबई : सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल १२’ हा रिअॅलिटी शो लोकप्रिय होत असताना अनेकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवर किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार आले होते. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा या शोची चर्चा सुरू झाली आहे. हल्ली टीआरपीसाठी रिअॅलिटी शो काय करतील याचा नेम नाही. याबाबत ‘इंडियन आयडल १२’ शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण याने मोठा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत आदित्यने सांगितले की, ‘इंडियन आयडल १२ ‘ मध्ये पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सांगण्यात येतेय, पण हे सगळं खोटं आहे. पवनदीप व अरूणिताचा लव्ह अँगल बनावटी असून त्यात काहीही सत्य नाही. दोघेही मुळीच रिलेशनशिपमध्ये नाहीत, असे आदित्यने कबुल केल आहे.
पवनदीप व अरूणिताचा खोटा लव्ह अँगल का दाखवला जातोय, असे विचारले असता यामागे निव्वळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा एकच उद्देश असल्याचे तो म्हणाला. एक एपिसोड ९० मिनिटांचा असतो. यात स्पर्धकांच्या परफॉर्मन्सशिवाय आणखी काय दाखवले जाईल, हे ठरवले जाते. प्रेक्षकांनी कंटाळून चॅनल बदलू नये आणि त्यांचे मनोरंजन व्हावे, या एकाच हेतूने काही गोष्टी दाखवल्या जातात. पवनदीप आणि अरुणिता यांनी एकमेकांबद्दल छेडणे हा मस्तीचा भाग असतो. ते कोणीही सीरिअस घेत नाही तर फक्त एन्जॉय करतात, असे आदित्य म्हणाला.
तसेच पुढे त्याने मी प्रेक्षकांना विनंती केली की, त्यांनी फक्त शोच्या स्पर्धकांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करावं. आम्ही सर्वजण आपआपल्या भूमिका साकारत आहोत. स्टेजवरच्या आणि प्रेक्षकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा फक्त रिअॅलिटीवर फोकस करा आणि उर्वरित गोष्टी फक्त एन्जॉय करा. मालिकेतील कलाकार एक सीन शूट केल्यानंतर लगेच त्यांच्या ख-या पार्टनरकडे जातात, असेही आदित्य यावेळी म्हणाला. या शोमधील एकामागे एक खुलासे होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. मात्र पवनदीप व अरूणिता यांच्या चाहता वर्गाला हे समजल्यानंतर चांगलाच धक्का बसला असेल.
महत्वाच्या बातम्या
- १९ मे रोजी प्रदर्शित होणार ‘फॅमिली मॅन २’चा ट्रेलर; अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची घोषणा
- एबीचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन नाहीच; दक्षिण अफ्रिका बोर्डाने केले स्पष्ट
- ‘कोरोनाचा हाहाकार ; केंद्र व राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?’
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
