कोलकाता – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात समन्स पाठवले आहे. याशिवाय बंगाल सीआयडीचे एडीजी ज्ञानवंत सिंग आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे.
दरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण लोकांसमोर फासावर जाऊ असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे.नोव्हेंबरमध्ये जाहीर सभेत जे मी बोललो होतो त्याचा पुनरुच्चार करत आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात माझा 10 पैशांचाही संबंध असल्याचं सिद्ध करू शकले तर ईडी किंवा सीबीआय चौकशीची गरज नाही. मी स्वत: सर्वांसमोर फाशी घेईन असं म्हटलं आहे.
ते म्हणाले, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. पण ते गोष्टी सार्वजनिक का करत नाही आहेत? कोलकातामधील प्रकरणासाठी मला दिल्लीत हजर राहण्याचं समन्स दिलं आहे असा संताप अभिषेक यांनी व्यक्त केला. दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा उल्लेख न करता भाजपा नेत्याचं नाव नारदा लाच प्रकरणी दाखल चार्जशीटमध्ये का नाही? असा सवाल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “लस घ्या.. लस घ्या…”; मनी हाईस्टच्या चालीवरील गाणं ठरतयं प्रेक्षकांच्या पसंतीस
- राज्यात राजकीय संघर्ष; एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय – शरद पवार
- अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढणार; ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- ब्राह्मण हे विदेशी आहेत, असं वक्तव्य केल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

