मुंबई – शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर हा संघर्ष आणखी पेटणार अशी शक्यता वर्तविली जात असताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या धडक कारवाईमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना नुकताच सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशीचा समन्स बजावला होता. त्यासाठी मागील आठवड्यात ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, अनिल परब ईडीसमोर उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी याबाबतचं कारण ईडी कार्यालयाला पत्राद्वारे कळवलं आहे. त्याचबरोबर हजर राहण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागितला आहे. अनिल परब यांनी वकिलांच्या माध्यमातून ईडीला पत्र पाठवलं आहे.
दरम्यान, आता अनिल परब यांना ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता आहे. याआठवड्यात त्यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल परबविरोधी ईडीकडे तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. यामुळे एकंदरीतच परब यांच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- “लस घ्या.. लस घ्या…”; मनी हाईस्टच्या चालीवरील गाणं ठरतयं प्रेक्षकांच्या पसंतीस
- राज्यात राजकीय संघर्ष; एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय – शरद पवार
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- ब्राह्मण हे विदेशी आहेत, असं वक्तव्य केल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
