Share

राज्यात राजकीय संघर्ष; एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय – शरद पवार

Published On: 

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील ऐनवेळी शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं असून सेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. कोरोना, भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांच्या बदल्या, चक्रीवादळग्रस्त-पूरग्रस्त यांना मदत अशा विविध मुद्द्यांवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून काही मंत्र्यांवर गंभीर आरोप देखील केले आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय वर्तुळामधील वातावरणाबाबत भाष्य केलं आहे. मंचर येथे दिवंगत किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम पवार यांच्या हस्ते पार पडला. यानंतर बोलताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने आज संघर्ष दिसत आहे. एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय. मग वक्तव्य मागे घ्यावे लागतायेत त्यांच्यावर दिलगिरी ही व्यक्त करण्याची वेळ येते. महाराष्ट्रातील ही आजची परिस्थिती आहे. किसनराव बाणखेले विरोधात असताना देखील जे वागायचे, त्याची कमतरता दिसते.’

आमच्या काळात शेतमाल फेकून देण्याची वेळ येऊ दिली नाही

‘आमच्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली येऊ दिले नाही. सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागत आहे’,असं सांगत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!