🕒 1 min read
मुंबई : पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव सध्या गगनभरारी घेत आहे. त्यातच आता सौरउर्जा प्रकल्पाची सबसिडीज केंद्र सरकार काढून घेण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
सौरऊर्जा निर्मिती आता मूठभर उद्योजकांची मक्तेदारी बनलीय असं ऐकतो. केंद्र सरकारने सर्व सबसिडीज काढून टाकल्यात म्हणे. सामान्य माणूस, शेतकरी, आणि पर्यावरण गेलं चुलीत.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 16, 2021
‘सौरऊर्जा निर्मिती आता मूठभर उद्योजकांची मक्तेदारी बनलीय असे ऐकतो. केंद्र सरकारने सर्व सबसिडीज काढून टाकल्यात म्हणे. सामान्य माणूस, शेतकरी, आणि पर्यावरण गेलं चुलीत’ अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
दरम्यान, पेट्रोलने शंभरी ओलांडून त्याचे दर १०८ रुपयापर्यंत पोहोचले आहे. तर डिझेलने सुद्धा ९७.४५ एवढा आकडा गाठला आहे. तसेच घरगुती गॅस देखील ८३४ रुपये एवढा महाग झाला आहे. अशात आता उर्जेचे भाववाढ किंवा सौरऊर्जावरील सबसिडीज काढून घेतली तर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखीन ओझे होईल हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
- व्यवस्थेला जेरीस आणू, पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही-विजय वडेट्टीवार
- मोदींच्या भेटीबाबत खुद्द शरद पवारांनी केला खुलासा, म्हणाले..
- ‘अमिताभ बच्चन हे मोदी सरकारच्या कामगिरीवर तर बोलत नाही ना?’, सत्यजित तांबे यांचे खोचक ट्विट
- पवार आणि मोदी यांच्यात राजकीय चर्चा तर होणारच!; ‘त्या’ भेटीवर दरेकरांची प्रतिक्रिया
- ‘..तर मग ‘त्या’ बार मालकांची साधी चौकशीही का केली नाही?’, काँग्रेसचा ईडीला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
