Share

स्वप्नील जोशीच्या ‘समांतर’वर रंगली औरंगाबादमध्ये वेगळीच चर्चा

Published On: 

मुंबई : सुहास शिरवळकर यांच्या समांतर या पुस्तकावर आधारीत स्वप्नील जोशी अभिनीत समांतर ही वेब सिरीज चांगलीच गाजली होती. पहिला भाग प्रदर्शीत झाल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. काही दिवसापुर्वीच समांतर २ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सगळीकडे संमातर या वेब सीरीजची चर्चा सुरु आहे. मात्र औरंगाबादमध्ये या चर्चेला वेगळेच वळण लागले आहे. ट्विटरवर इडलीवाला आण्णा या नावाच्या युजरने एक भन्नाट ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांने लिहीले आहे की, ‘स्वप्नील जोशीच्या दोन समांतर वेबसिरीज आल्या, पण १५ वर्षांत औरंगाबादला ‘समांतर’ काय आलीच नाही. आठ दिवसाला एकदा पाणी येतं नळाला, पण नागरिक कोण काही आवाज काढत नाहीत.’ अशा प्रकारे या युजरने ‘समांतर’ वेब सिरीजचा संबध औरंगाबादमधील ‘संमातर जलवाहिनी’शी जोडला आहे.

या पोस्ट वर एकाने कमेंट करुन समांतरचा एक भाग इथे शुट व्हायला पाहिजे असे सुचवले. तर त्यावर प्रतिक्रिया देताना एकाने समांतर ३ मध्ये स्वप्नील जोशीला पाण्याची वाट बघताना दाखवायला हवे असे सुचवले. गेल्या १५ वर्षापासुन औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी समांतर जलवाहीनीचा प्रकल्प आणला होता. या प्रकल्पाला १५ वर्षे होत आली तरीही हा प्रकल्प मार्गी लागत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!