🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील अन्नदाता गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी बसला आहे. या आंदोलनाची धग देशभरात पोहचत असताना प्रजासत्ताक दिनी झालेल्या गोंधळानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत होती.
प्रजासत्ताक दिनी झालेल्या घटनेचा सर्वच राजकीय नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी निषेध केला असला तरी आता आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगत असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली वेळी झालेल्या घटनेच्या पाठीशी भाजपचाच हात असल्याची टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी एबीपी माझा ला प्रतिक्रिया दिली आहे.
‘ गेले दोन महिने हे आंदोलन शांतपणे सुरु होते. देशभरातून या आंदोलनाला सहानभूती देखील मिळत होती. मात्र आता सिंघू बॉर्डरवर पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय. सरकारला बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना उखडून टाकायचं आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी जी परिस्थिती चिघळली तो पूर्वनियोजित कट होता. हे काम नक्कीच सरकारचं आहे, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे हे भाजपवलेच होते हे व्हिडिओतून समोर आलं आहे’ असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात आलबेल; पण स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडी
- ‘मोदीजी लक्षात ठेवा, तुमची तिजोरी अंबानी-अदानी नक्की भरतील, पण तुमचे ‘पोट’ अन्नदाता शेतकरीच भरतील’
- ‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’; ‘त्या’ ठाकरेंच्या उपस्थितीवर वरुण सरदेसाईंनी डागली तोफ
- कुलाबा येथील महापालिका शाळा आरक्षण मागच्या दाराने रद्द करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव – भाजपा
- बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश


