🕒 1 min read
गडचिरोली : देशात कोविड -19 ची महाभयकंर परिस्थिती उद्भ्वाल्यामुळे सर्व देशभर शासनाद्वारे लॉकडाऊन केल्या गेले होते . त्यामुळे गेल्या 10 महिन्यापासून समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणारे शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या. कोविड-19 ची परीस्थिती नियंत्रणात येताच शासनाने यासाठी नागपूर विभागाचे डॉ. सिध्दार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नागपूर यांनी शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कोविड परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी बरेचसे शासकीय व निवासी शाळा हया कोविड केअर सेंटर म्हणून देण्यात आलेले होते. सद्यस्थितीत शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. समाज कल्याण विभागाचे वसतिगृहे हे ग्रामिण व शहरी भागातील गरीब व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेले आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नागपूर विभागातील सर्व निवासी शाळा वसतिगृहे सुरु करण्यात येत आहे. वसतिगृहे सुरु करण्याआधी सर्व वसतिगृहांची स्वच्छतेच्या बाबीवर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्यासाठी थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर, सॅनिटायझर इ. व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना वसतिगृहात पाठवावे तसेच ज्यांना सर्वातगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी नव्याने अर्ज करावे असे जाहीर आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूरचे डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
- ‘शरजीलवर कारवाई का होत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे’
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहात का? – नवाब मलिक
- महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणा – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
