🕒 1 min read
मुंबई : शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना भाजपाकडून 50 कोटी मिळाल्याची टीका शिवसेना कडून वारंवार होतीये. असा आरोपही शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून केलाय. याच बदल्यात शिंदे गटाकडूनही खोक्यांच्या मुद्द्यांवरून शिवसेनेवर टीका होतीये. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रीयाः
अचानक पडलेल्या दणक्यामुळे अजून त्यांची नशा उतरलेली नाही. त्यामुळे समोरच्याला खोखी संघटना दिसत आहे. ज्यांची प्रवृत्ती खोक्यांचीच आहे, तेच खोक्यावर बोलतात. त्यांचं आयुष्य खोक्यात गेलं, त्यांना खोकीच दिसणार ज्यांची खोटी संस्कृती तीच टीका करतात, सामनातून लिहितात, हे चुकीच आहे, अशी टीका शहाजी बापू यांनी केली.
आज पातळी सोडून काही लोक राजकारण करताना दिसत आहे. त्यामुळे खोक्यावरून वारंवार टीका करत आहेत असं बापू यांनी सांगितलं. तर तानाजी सावंत हे निष्क्रिय नाही तर कार्यक्षम मंत्री आहेत, असं सांगताना शिवसेनेच्या दुसऱ्या मेळाव्यावर काही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला असून 12 सप्टेंबर पासून मतदार संघात दौरा करार असल्याचेही शहाजीबापूंनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्याः
- Shahajibapu Patil | “जे खोके घ्यायचे, तेच आता बडबडताय…”, शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना गटावर साधला निशाणा
- Nilesh Lanke | ज्याचं बँकेत अकाउंट नाही त्याच्यामागे ईडी लागते – निलेश लंके
- IND vs PAK | आशिया कपमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानवर नेहमीच राहीले आहे वर्चस्व, जाणून घ्या रेकॉर्ड!
- Free Travel | मोठी घोषणा! महाराष्ट्रातील 75 वर्षांवरील वृद्धांना मोफत प्रवास
- IND vs PAK | “माझ्या हातात असते तर…” ; सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर रोहित शर्माचे मोठे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
