🕒 1 min read
Deepak Kesarkar । मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार स्थापन झाले. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा गाडा हाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र या सर्व घडामोडी घडताना शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अनेक मोठी वक्तव्ये आणि गौप्यस्फोट केले आहेत. लवकरच उद्धव ठाकरे आम्हाला समजून घेतील आणि आशा आहे की ते आम्हाला आशीर्वाद देतील, असं विधान करत त्यांनी शिंदे-ठाकरेंचे संबंध जुळवण्याचा प्रयत्न देखील केला.
तसेच राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान राखत नाहीत. सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेली आहे. बंडाच्या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच ही वेळ आल्याचे दीपक केसरकर यांनी वारंवार सांगितले होते. मात्र यानंतर आता आपल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी शरद पवार यांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवाय ते एक ज्येष्ठ नेते असून माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचेही केसरकर म्हणाले आहेत.
दरम्यान, यापूर्वीही बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधत हे पाऊल उचलल्याचे सांगितले. तसेच आम्ही आता सत्तेमध्ये भाजपसोबोत आलोत. एक कुटुंब तयार झालं. आम्ही आता एकटे नसून आमच्या कुटुंबात आता भाजप आहे. नवीन कुटुंब तयार झालं आहे. आम्हाला मातोश्रीवर बोलताना त्यांना भाजपला देखील बोलवावं लागेल, अशी अट देखील याआधी केसरकर यांनी मातोश्रीवर जाण्यासंदर्भात ठेवली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Mahesh Tapase : इंधन दर कपातीचे श्रेय अजित पवार यांचे – महेश तपासे
- Jayant Patil । “१५ दिवस झाले तरी यांना सरकार स्थापन करता आले नाही”; जयंत पाटील यांचा टोला
- MNS : युवराजांना लवकरच शिल्लकसेनेसाठी यात्रा काढावी लागणार; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
- Gajanan kale MNS | छोटे नवाबांनी शिल्लक यात्रा काढावी ; गजानन काळेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
