Share

Nitesh Rane : “…तर ‘निष्ठा’ यात्रा काढण्याची वेळ आली नसती”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाला मोठा आणि जबर धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढणार आहेत. यावरूनच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टोला लगावला आहे.

“स्वतःच सरकार असताना DINO वर निष्ठा दाखवण्या पेक्षा तीच निष्ठा शिवसैनिकांवर दाखवली असती तर “निष्ठा” यात्रा काढण्याची वेळ आली नसती!”, असे ट्वीट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून अर्थातच आजपासून सुरुवात होणार आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करतील. याद्वारे शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात केली जाणार आहे. मात्र शिवसेनेला त्यापूर्वीच अजून एक मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!