🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसोबत मिळून सरकार स्थापन केले आहे. लवकरच शिंदे गट शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा करणार आहे. यासंदर्भातच “कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे नवे चिन्ह मिळेल ते कमी वेळेत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा”, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहे.
दरम्यान शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली असून याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आले आहे.
त्यातच शिवसेना आमदारांसोबत शिवसेना खासदारांचाही पाठींबा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच गुरुवारी ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Atul Bhatkhalkar : “शिवसेनाप्रमुखांच्या काळात प्रचंड दबदबा…”, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Sanjay Raut : “…यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे? संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा
- MNS VS Shiv Sena : शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात; ‘मनसे’नी म्हटले, “जमिनीवर राहून आदर…”
- NCP VS BJP : ‘मोदी है तो मुमकीन है’ इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचा केंद्रावर निशाणा
- Radhakrishna Vikhe Patil : भरकटलेलं जहाज आणि बेताल प्रवक्ते एवढीच शिवसेना शिल्लक राहिलीय – राधाकृष्ण विखे पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
