Share

INDW vs SLW : पहिल्या टी-२० सामन्यातील विजयानंतर हरमनप्रीत खुश! म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा (INDW vs SLW) ३४ धावांनी पराभव केला. भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना बांधून ठेवत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. या विजयानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आनंद व्यक्त केला आहे.

हरमनप्रीत म्हणाली, ”मला वाटते याचे श्रेय सर्व खेळाडूंना द्यायला हवे कारण त्यांनी आत्मविश्वास दाखवला आणि जेमिमाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती अप्रतिम होती. एक संघ म्हणून, आम्हाला नेहमीच पहिली सहा षटके वापरायची आहेत आणि त्याशिवाय सर्व काही आमच्या योजनेनुसार झाले. आम्ही येथे आमच्या वेळेचा आनंद घेत आहोत आणि लोक येतात आणि आम्हाला खेळतात पाहतात, या गोष्टीनेच आनंद झाला आहे.”

प्रथम फलंदाजी करताना भारताने १७ धावांवर स्मृती मानधनाची विकेट गमावली. यानंतर त्याच स्कोअरवर भारताला दुसरा धक्का बसला. कर्णधार हरमनप्रीतही २२ धावा करून बाद झाली. सलामीवीर शफाली वर्माने ३१ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमिमाने ३६ धावांची खेळी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला २७ धावांवर तीन धक्के देत शानदार सुरुवात केली होती. राधा यादवने सातव्या षटकात दोन गडी बाद करत यजमानांना जोरदार धक्का दिला. कविशा दिलहरीने एकटीने झुंज दिली, पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. कविशाने ४७ धावांची खेळी खेळली. भारतातर्फे पूजा वस्त्राकरने चार षटकांत केवळ १३ धावा देऊन एक बळी घेतला. राधाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!